जेव्हा
31 डिसेंबरच्या मध्यरात्री घड्याळाचे काटे 12 वाजण्याच्या दिशेने जातील आणि
कॅलेंडर नवीन वर्षाकडे, तेव्हा काहीतरी नवीन करण्याचा संकल्प
बऱ्याचदा मनात येतो. बऱ्याचदा मोठ्या उत्साहाने असे संकल्प केले जातात पण ते फार काळ
टिकत नाहीत. त्यासाठी पूर्णपणे मानसिक तयारी करून संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन
वर्ष हे भूतकाळाचे चिंतन करण्याची आणि भविष्यासाठी नवीन ध्येय निश्चित करण्याची
संधी घेऊन येत असते. ही संधी लक्षात घेऊन सुयोग्य संकल्प करणे हे नक्कीच स्वागतार्ह
आहे. वैयक्तिक बांधिलकी, आत्म सुधारणा
यासाठी अशा प्रकारचे संकल्प हे फार आवश्यक आहेत. पुढील वर्षाचा संकल्प
करण्यापूर्वी मागील वर्षाचा विचार करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. मागील वर्षी
चांगले काय होते? वाईट काय झाले? आपण त्यातून कोणते धडे शिकलो? या गोष्टींचा विचार
करणे आवश्यक आहे.
आपला
संकल्प निश्चित करताना आपली उद्दिष्टे ही विशिष्ट, मोजण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य,
संबंधित आणि कालबद्ध असली पाहिजेत. छोटी छोटी उद्दिष्टे आपणास मोठ्या
उद्दिष्टापर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्याची आखणी करणे गरजेचे आहे.
महत्त्वकांक्षी उद्दिष्टे निश्चित करणे हे जरी बरोबर असले तरी आकांक्षा आणि
वास्तववाद यांच्यात समतोल राखणेही महत्त्वाचे आहे. अवास्तव संकल्पना निराशेला
कारणीभूत ठरू शकतात, म्हणून उद्दिष्टांची निवड खूपच काळजीपूर्वक करावी लागते.
छोट्या उद्दिष्टांसह प्रारंभ करणे फार आवश्यक आहे.
संकल्प
करताना त्यात विविधता ही असली पाहिजे. आपल्या जीवनातील फक्त एकाच पैलूवर तो संकल्प
केंद्रित करणे आवश्यक नाही. शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, करियर, नातेसंबंध
आणि वैयक्तिक विकास या विविध आयामांमध्ये, आपल्या ध्येयांमध्ये विविधता आणण्याचा
विचार आपण करू शकतो. संकल्पामध्ये स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
पुरेशी झोप घेणे किंवा आपल्या आवडीच्या छंदासाठी वेळ देणे याला संकल्पात जागा देणे फार आवश्यक आहे. संकल्प हा एक प्रवास
आहे, ते पोहोचण्याचे ठिकाण नाही,
हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
वाटेत
विविध टप्प्यांवर आपण आपले यश हे साजरे केले पाहिजे, अगदी ते कितीही लहान असले तरी.
याउलट अडथळ्यांकडे वाढ आणि शिकण्याची संधी म्हणून आपणाला पहावे लागेल. आवश्यकता
वाटल्यास आपले ध्येय हे समायोजित करून लवचिकता आणि दृढ निश्चयाने आपणाला पुढे जावे
लागेल. मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत आपला संकल्प शेअर केल्याने
त्याचा नक्कीच लाभ होतो. त्यातून आपला हा प्रवास अधिक आनंददायक
बनू शकतो.
आपण
आपल्या ध्येयाचे प्रतिनिधित्व करणारे व्हिजन बोर्ड तयार करू शकतो. दैनंदिन
स्मरणपत्र म्हणून काम करण्यासाठी ते सतत दिसतील अशा ठिकाणी ठेवणेही आवश्यक आहे. परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे आवश्यकतेनुसार आपल्या ध्येयात लवचिकता आणावी लागते. ज्यामुळे आपणास पराभूत न
वाटता अनपेक्षित आव्हानांशी जुळवून घेता येते, आपली दिनचर्या आणि सवयी आपणास
स्थापित कराव्या लागतील. नवीन सवयी तयार करण्याच्या बाबतीत सातत्य ही महत्त्वाची गोष्ट
आहे आणि एक सुस्थापित दिनचर्या आपल्या प्रयत्नांना नक्कीच मदत करू शकते. आपल्या
प्रगतीचा नियमितपणे मागोवा घेणे आवश्यक आहे. सकारात्मक बदलांवर चिंतन आणि अधिक
लक्ष देण्याची गरज असलेली क्षेत्रे आपणास ओळखता आली पाहिजेत. आपल्या प्रवासाचे
निरीक्षण केल्याने मौल्यवान अंतरदृष्टी आणि प्रेरणा मिळत असते.
सतत
काहीतरी नवीन शिकणे आवश्यक आहे. हे
केवळ आपली क्षितिजे विस्तृत करत नाही तर आपले मन गुंतवून ठेवते आणि नेहमी प्रेरित
करते. नवीन कौशल्य शिकणे किंवा आवड असलेल्या
क्षेत्रात ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. समान उद्दिष्टे किंवा आवड असंणाऱ्या गटांमध्ये
आपण सामील झाले पाहिजे. अशा प्रवासात इतरांशी संपर्क साधल्याने सौहार्द आणि
प्रोत्साहन मिळत राहते. वाढ, लवचिकता आणि आत्मकरुणा या मानसिकतेसह नवीन वर्षाकडे
गेले पाहिजे. प्रत्येक पाऊल किती लहान असले, तरीही ते जाणीवपूर्वक टाकले पाहिजे. मग यश आपलेच आहे.
नवीन वर्ष म्हणजे आपल्या आकांक्षा आणि स्वप्न रंगवण्यासाठी आपली वाट पाहणारा कॅनव्हास आहे. विचारपूर्वक चिंतन, वास्तववादी ध्येय निश्चिती आणि आत्म सुधारण्यासाठी वचनबद्धतेसह आपण 2025 हे वर्ष अर्थपूर्ण, यशांचे आणि चिर स्थायी सकारात्मक बदलांचे वर्ष नक्कीच बनवू शकतो.


